– शिवसेना (उबाठा) जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन
– बाळासाहेब ठाकरे यांची जयंती गिलगाव येथे उत्साहाज साजरी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : हिंदु हृदयसम्राट मा. बाळसाहेब ठाकरे यांचे नाव उच्चारताच अंगात उर्जा निर्माण होऊन रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. मा. बाळासाहेब असे व्यक्तीमत्व आहे की त्यांचे विचार व कार्याने काम करण्याचे बळ मिळते. जाती आणि वाद गाडून मराठी माणसाची एकजूट उभारा, तरच महाराष्ट्र टिकेल असा उपदेश देत मराठी हा सन्मान असून प्रत्येक मराठी माणसामध्ये स्वाभिमान जागृत केला. त्यामुळे आज आपला महाराष्ट्र व मराठी माणसाची किर्ती देशातच नव्हे तर सातासमुद्रापार पसरली आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.
हिंदु हृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळसाहेब ठाकरे यांची जयंती मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गिलगाव येथे शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. अरविंदभाऊ कात्रटवार व शेकडो शिवसैनिकांनी मा. बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार शिवसैनिकांना संबोधित करताना म्हणाले की, मा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व कार्यांनी प्रेरीत होऊन प्रत्येकांने कार्य करण्याची गरज आहे. मराठी माणूस पुढे गेला पाहिजे तो स्वाभिमानी बनला पाहिजे. आत्मबळ आणि आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मरण नाही. दुसऱ्यांकडे नोकरी मागण्यापेक्षा इतरांना नोकरी देण्याची महत्वकांक्षा मराठी मानसाने बाळगली पाहिजे, अशी शिकवण शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस व आपल्या शिवसैनिकांनी दिली. मा. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरीत होऊन आज प्रत्येक मराठी तरूणांनी काम करण्याची गरज आहे. शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रात हिंदुत्वाची मशाल प्रखर केली. अयोध्या येथे राममंदिरासाठी त्यांचे योगदान कोणीही विसरू शकणार नाही. आजच्या राजकारणाचे बाजारीकरण झाले आहे. शिवसेना प्रमुखांनी ज्यांना मायेची ऊब देऊन मोठे केले ते आज मा. बाळसाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन स्वाभिमान बाजूला ठेवून केवळ स्वार्थासाठी दुसऱ्यांशी घरोबा करून आहेत. अशा संधीसाधूंना तमाम शिवसैनिक व मराठीजणांनी धडा शिकविला पाहिजे. हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्या विचार व कार्याची ज्योत सदैव तेवत ठेऊन जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्यरत राहणार, असेही अरविंदभाऊ कात्रटवार याप्रसंगी म्हणाले.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, संदिप भुरसे, संजय बोबाटे, अमित बानबले, दिलीप चनेकार, प्रशांत ठाकूर, ज्ञानेश्वर आवारी, तुषार बोरकर, धनंजय लडके, रमेश आवारी, टिकाराम कोसमशिले, सुनिल कोसमशिले, मनोहर कोसमशिले, विलास खोब्रागडे, नथ्थु हर्षे, कैलास फुलझेले, हरिदास हर्षे, जयंत मेश्राम, बबन आवारी, एकनाथ हर्षे, श्रीहरी पासांडे, आकाश सोरते, प्रफुल मेश्राम, वासुदेव मडावी, मंगल भरणे, दिलीप आवारी, उमाजी बोरकर, वसंत नगारे, समीर खेडेकार यासह शेकडो शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.





