विदर्भ क्रांती न्यूज
सावली : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवडा कार्यक्रम निमित्याने मान. खासदार अशोकजी नेते यांना तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी सावली तालुक्यातील विविध घडलेल्या घटनेसंदर्भात चकपिरंजी व बेलगाव या ठिकाणी अपघातातील मृत्यू पावलेल्या घटनेची माहिती दिली असता यासंबंधी दखल घेऊन चकपिरंजी येथे शेतात काम करीत असताना अचानक आकाशातील वीज स्व. मंगलाबाई सुधाकर येलंटीवार वय ५५ वर्षे हिच्यावर पडल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. तसेच बेलगाव येथील सरपंच स्वर्गीय अंबादास पाल वय ५३ वर्ष शेतामध्ये शेत शिवारात काम करीत असताना शेतामध्ये विद्युत करंट लागून जागीच मृत्यू झाला. या घडलेल्या दोन्ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. अशोकजी नेते यांनी प्रत्यक्षात चकपिरंजी येथे येलंनटीवार व बेलगाव येथील पाल या दोन्ही परिवारातील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सामील झाले व त्यांच्या कुटुंबीयांना सहानुभूतीपूर्वक सांत्वन देऊन आर्थिक मदत सुद्धा यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी खा. अशोकजी नेते गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबिसी आघाडीचे अविनाश पाल, कोषाध्यक्ष अर्जुनजी भोयर, माजी जि. प. सदस्या मनिषाताई चिमूरकर, भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते भुवनजी सहारे, मोतीरामजी चिमुरकर, भाजपाचे युवा कार्यकर्ते डियेच आभारे, मुक्तेश्वर थोरात, लोकनाथजी रायपुरे, प्रकाशजी लाटकर, बबनराव कांडूरवार, उपसरपंच मनोहर बोरकुटे, विनायक बोरकुटे, रविंद्र तिवाडे, राहुल गुरुनुले, लक्ष्मण मंडरे, सुनिल पोवनकार, वासुदेव मांदाळे, नितीन भोपये, ठामदेव बोरकुटे, उमाकांत पाल, अंबादास बोरकुटे, दिवाकर बोरकुटे, साईनाथ चरडे, सुरेश जवादे, तसेच चकपिंरजी व बेलगाव येथील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.