आष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन

63

– सुरजागड लोहखनिज प्रकल्प व जिल्ह्यातील इतर विविध मागण्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील आंबेडकर चौकात राकाँँ जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, रायुकाँँ जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, बबलुभैया हकीम यांच्या नेतृत्वात 25 ऑगस्ट रोजी चक्काजाम आंदोलन करून सुरजागड प्रकल्पासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी चामोर्शीचे तहसीलदार यांच्या माफतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

ओला दुष्काळ जाहीर करा, आष्टी – आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर सुरजागड लोहखनीज प्रकल्पातील जळवाहतूक ओव्हरलोडेड ट्रक बंद करण्यात यावे, आष्टी -आलापल्ली रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, सुरजागड लोहखनीज प्रकल्पातून कच्चा माल घेऊन जाणारे ट्रक पर्यावरण नीयमांचे उल्लघंन करत आहेत तरी, तत्काळ त्या ट्रकवर ताडपत्री बांधून जळणवळण करावे, कोनसरी घाटकुर रस्त्याचे तत्काळ सुधारणा करावी व जडवाहतूक बंद करावे, आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पुलाचे काम तात्काळ पुर्ण करावे, कोनसरी लोहप्रकल्पामध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य द्यावे, आलापल्ली सिरोचा राष्ट्रीय महामार्गाचे तत्काळ काम सुरू करावे, मेडीगट्टा धरणामुळे आपल्या शेतकऱ्याचा कोणताही फायदा नसताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे धरणातून येणाऱ्या बँँक पाण्यामुळे सिरोचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरपरस्थितीमुळे शेती, घरे, जनावरे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी सदर कराराबाबत पुनर्निरिक्षण करावे आदी मागण्यांंसाठी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राकाॅंचे सरचिटणीस रिंकू पापडकर, गडचिरोली शहराध्यक्ष विजय गोरडवार, राविकाॅंचे जिल्हाध्यक्ष चेतन पेंदाम, तालुका अध्यक्ष चेतन गद्देवार, रायुकाॅंचे जिल्हा उपाध्यक्ष नेताजी घोगरे, मीनल चिमूरकर, अमोल कुळमेथे, संजय कोचे, नागेश उरेत, लक्ष्मण यंटीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.