– नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्याची केली मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रानटी हत्तींनी प्रचंड धुडगूस घातला असून शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. त्यामुळे जीवितहानीची ही शक्यता बळावलेली आहे. करिता भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळण्यासाठी वनविभागाने या रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी वनविभागाकडे केली आहे.
यावेळी सरपंच भारती फुलझेले, माजी उपसभापती विलास दशमुखे, राजेंद्र मुरतेली, खुशाल चुधरी, रत्नाकर रंदये, दिलीप रंदये, किशोर रंदये, कवळू रंदये, उत्तम रंदये, गणपत मेश्राम, मनोहर मेश्राम, लालाजी मेश्राम, आनंदराव मडावी, कार्तिक नैताम, नामदेव मेश्राम, वासुदेव मेश्राम व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.







