विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकसीत भारताची संकल्पपूर्ती करणारा अर्थसंकल्प असून आत्मनिर्भर भारत निर्मितीला प्रोत्साहन देणारा व जनसामान्यांचे हित साधणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आजच्या अर्थसंकल्पावर दिली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प घेतला असून त्या संकल्पपूर्तीसाठी आजचा अर्थसंकल्प असून यातून जनसामान्यांना मोठा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या अर्थसंकल्पावर दिली.







