– आलापल्ली वन विभागातील घटना
– उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांची करवाई
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : हरणाची शिकार करून त्याची मटण वाटून झाल्याप्रकरणी दोन वनकर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची खळबळजनक घटना जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली वनविभागात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून वनप्राण्यांची शिकार करणाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आलापल्लीस्थित एफडीसीएमचे काही वनकर्मचारी हरणाची शिकार करून काही जणांना मटण वाटप करून शिजवित असल्याची गोपनीय माहिती आलापल्ली वनविभागात नव्याने रूजू झालेल्या उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी





