सुरजागड लोहप्रकल्पातील वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाच्या निराकरणासाठी बोरी येथे रस्तारोको आंदोलन

83

– आविसं सरसेनापती नंदूभाऊ नरोटे व माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे नेतृत्व

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सुरजागड लोहप्रकल्पातील वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाच्या निराकरण करण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आदिवासी विद्यार्थी संघटना व अजयभाऊ मित्र परिवार तसेच त्रस्त नागरिक यांच्यातर्फे आदिवासी विद्यार्थी संघटना सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात अहेरी तालुक्यातील बोरी येथील मुख्य चौकात ११ जुलै रोजी रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

आलापल्ली ते आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (C) या मार्गाने सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या जड वाहनांमुळे अनेक निरअपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक नागरिकांना अपंगत्व आले तर अनेकजण जखमी सुद्धा झाले आहेत. त्याचप्रमाणे आलापल्ली ते आष्टी या मार्गावरील अनेक गावे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असून लोहखनीज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमुळे गावातील व या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन कराव लागत आहे. विद्यार्थ्यांचे सन २०२३-२४ या वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून लगाम, बोरी तसेच राजपूर पॅच व इतर अन्य गावातील विद्यार्थांना नियमीतपणे शिक्षण घेण्यासाठी आलापल्ली व अहेरी येथील शाळेत ये-जा करावे लागते. मात्र सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहेत. त्यातच या मार्गावर नेहमीच हजारो अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना व अन्य नागरिकांना अपघाताची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने लोहखनीज वाहतूक करणारे वाहन रस्त्यावर फसून असल्याने वाहनांची खूप मोठी रांग निर्माण होऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असल्याने विद्यार्थ्यांना व अन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा शाळेच्या वेळेनुसार पोहचू शकत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचप्रमाणे अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम येथील लोहखनीज साठवणूक डंपींग यार्ड हे त्या गावातील नागरिकांना आणि त्या गावावरून ये-जा करणाऱ्या नागरिकासाठी शापच असल्याचे बोलले जात आहे. कारण लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमुळे तसेच रस्त्यावर होणाऱ्या चिखलामुळे अनेक दुचाकी वाहन धारक यांचा तोल जाऊन अपघात होत आहे. त्यामुळे मद्दीगुडम येथिल डंपिंग यार्ड लोहखनीज साठवणूक बंद करण्यात यावे अश्या प्रकारच्या मागण्या येथील नागरिकांच्या आहेत. तसेच मद्दीगुडम येथील वनविभागाच्या जागेवर अनेक लोहखनीज वाहतूक करणारे वाहने मोठ्या प्रमाणात उभी करण्यात येत आहे. सदर वाहनावर बंदी घालण्यात यावे. तसेच मद्दीगुड्म येथील डंपिंग यार्ड ला नियमाचे उल्लंघन करून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, आलापल्ली ते आष्टी मार्गावरील लोहखनीज वाहतूक बंद करण्यात यावे. कारण या मार्गांनी वाहतूक करणाऱ्या अनेक निरअपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात सदर मार्गाने ये-जा करणारे नागरिक अपघातामध्ये जखमी झाले आहेत. त्या निरपराध मृत पावल्या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तींना ५० लाख रुपये व अपंगत्व आलेल्याना १५ लाख रुपये तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना ५ लाख रूपयांची मदत देण्यात यावी, ज्या वाहनामुळे व वाहनचालकांमुळे अपघात झाला आहे. त्या वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावे, तसेच ज्याप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार आलापल्ली ते सिरोंचा मार्गाचे काम चालू असल्यामुळे त्यानी अवजड वाहने या मार्गाने वाहतूक करण्यासाठी बंदी घातली आहे. आलापल्ली ते आष्टी मार्गावरील जड वाहनांना सुद्धा बंदी घालण्यात यावे. सुरजागड पहाड़ीकडे जाणाऱ्या जंगलातून नवीन रस्त्याच्या बांधकाम होत आहे. परंतु या रस्त्याच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकाराची मंजूरी न घेता रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यांची चौकशी करून करवाई करण्यात यावी व वेलगुर टोला ते वडलापेठ रस्त्याची रुंदीकरण करून रस्ता तयार करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला लोकांची वस्ती व शाळा आहेत तसेच ग्रामपंचायत किंवा व ग्रामसभेकडून कोणत्याही प्रकारची नाहरकत प्रमाणपत्र न घेता सदर काम करत आहेत. त्यामुळे ते मंजूर असलेला काम रद्द करण्यात यावी. तसेच अहेरी ते आलापल्ली, अहेरी ते सुभाषनगर,अहेरी ते खमनचेरू आणि अहेरी ते आवलमरी या रस्त्यांच्या बांधकामांना मंजूरी देऊन सदर सर्व रस्ते बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. वरील सर्व मुद्दे लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघटना व अजयभाऊ मित्र परिवार तसेच त्रस्त नागरिक यांच्यातर्फे आदिवासी विद्यार्थी संघटना सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात बोरी येथील मुख्य चौकात चक्का आंदोलन करण्यात आले

या आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. या आंदोलनात आविसंचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे, माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रविंद्रबाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, सुनीता कुसनाके, अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष रोजा करपेत, अहेरी नगरपंचायतचे नगर उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, सुरेखा आलाम, अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गिताताई चालूरकर, बोरी ग्रामपंचायतचे सरपंच शंकर कोडापे, पेरमिलीचे सरपंचा किरणताई कोरेत, रेपनपलीचे सरपंचा लक्ष्मी मडावी, कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, लगाम धन्नूरचे सरपंचा रोशनी कुसनाके, गोविंदगावचे सरपंच शंकरीबाई पोरतेट, उपसरपंच तिरुपती अल्लूरी, उपसरपंच सचिन ओल्लेटीवार, पराग ओल्लालवार, माजी उपसरपंच अशोक येलमुले, माजी सरपंच प्रमोद आत्राम, रामलू कुळमेथे, माजी सरपंच जिलकरशाह मडावी, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, ग्रामपंचायत सदस्य मधूकर वेलादी, सुरेश गंगाधरीवार, कालीदास कुसनाके, प्रणाली मडावी, लक्ष्मी सड़मेक, श्रीनिवास राऊत, महेश लेकूरू, संजय गोंडे, राजेश दुर्गे, प्रमोद कोडापे, सुरेश तोगम, पांडूरंग रामटेके, वासुदेव सीडाम, गंगाराम मडावी, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, नरेश गर्गम, प्रकाश दुर्गे, जितू पंजलवार, नारायण चालूरकर, लक्ष्मण आत्राम यांच्यासह बोरी, राजपुर पँच, महागाव (खुर्द), महागाव (बुज), जामगाव, शांतीग्राम, लगाम, धनूर, रामपूर चेक, रायपूर, शिवणीपाठ, ओडीगुडम, कोठारी, अहेरी, रेपनपल्ली, इंदारम, चिंतपेठ, वडलापेठ, मुत्तापुर, वेलगूर, राजाराम व अन्य गावातील समस्याग्रस्त नागरिक, आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.