गडचिरोली जिल्ह्याची स्थानिक भरती झालीच पाहिजे : तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम

10

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली हा जिल्हा नक्षलग्रस्त अतिदुर्गम म्हणून या महाराष्ट्रात ओळखला जातो. या जिल्ह्यात वर्ग (क व ड) च्या पदभरत्या ह्या स्थानिक जिल्ह्यातीलच विद्यार्थ्यांसाठी घेण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून अनेक बेरोजगार विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केली आहे. जिल्हा स्टेडियम ते इंदिरा गांधी चौक गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवा-युवती यांनी शासनाचे लक्ष लागावे याकरिता मोर्चा सुद्धा काढला. या मोर्चाचे नेतृत्व सिनेट सदस्या तनुश्री धर्मराववबाबा आत्राम यांनी केले.