प्रत्येक समाज बांधव व भगिनींनी सामूहिक विवाह सोहळ्याकडे वळावे : खा. अशोकजी नेते

59

– आदिवासी कवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोहले) यांच्या वतीनेे आदर्श सामूहिक विवाह सोहळा

– २१ जोडपे झाली विवाहबद्ध

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोरची येथील आदर्श सामुहिक विवाह संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार.अशोकजी नेते यांनी बोलतांना मागील दोन अडीच वर्ष कोरोनाच्या काळात गेल्याने विवाह सोहळे होऊ शकले नाही. आज लग्नसमारंभावर होणारा अनावश्यक पैसा पाण्यासारखा खर्च करून अनावश्यक‌ उधळपट्टीत खर्च केला जातो. अनेकदा अशा विविध वर्गांमधील स्पर्धेचे स्वरूपही येत असुन लग्न समारंभात आपला दर्जा दाखवण्यासाठी सामान्य माणूसही कर्जबाजारी होतो. कारण अनेक मुलींचे लग्न करताना वडिलांची कंबर मोडते, अशा प्रकारे लग्नासाठी घेतलेल्या कर्जामुळे उर्वरित आयुष्य कठीण होते. ही सर्व परिस्थिती टाळण्यासाठी गरजू कुटुंबातील मुलींनी कोणताही खर्च न करता विवाह लावावा, यासाठी अशा संस्थांची भूमिका कौतुकास्पद ठरते, असे प्रतिपादन या सामुहिक सोहळा संमेलनाच्या उद्घाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी केले.

खासदार महोदय पुढे बोलताना या सामुहिक विवाह कार्यक्रमांमध्ये चांगली संख्या दिसून येत आहे. हे देखील कौतुकास्पद आहे. या विवाह सोहळ्यात वेळेचा अपव्यय, हुंडा, उधळपट्टी यांसारख्या वाईट प्रथांपासूनही समाजाची सुटका होते. यासाठी समाजातील एका मोठ्या घटकानेही यात सहभागी होणे आवश्यक आहे. सामूहिक विवाहाचा फायदा असा आहे की होणारा अनावश्यक खर्च वाचु शकतो. विवाहावर होणारा अवाजवी खर्च इत्यादीमुळे समाजातील विविध घटकांनी सामूहिक विवाहांना प्रोत्साहन देणे आणि इतर वर्गांना जागरूक करणे ही देखील आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सामुहिक विवाहामुळे समाजात सामाजिक ऐक्य आणि जागृती येते, असे वक्तव्य यावेळी केले.

या आदर्श संमेलनाध्ये सत्कारणी मूर्ती म्हणून गणेश फुलकवर (ए.पी.आय.) कोरची, गणेश सोनवानी नायब तहसिलदार कोरची, चेतन जमकातन लेखा अधिकारी गडचिरोली, ‌जितेंद्र साहाळा (SET) उत्तीर्ण, भाग्यश्री कपाट BAMS निवडीकरिता खासदार अशोक नेते व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

‌‌ ‌आदर्श विवाह संमेलनामध्ये एकूण वर -वधुचा परिचय करून 21 जोडपांंचा विवाह लावुन देण्यात आला. त्यांंना भेटवस्तु ‌देऊन पुढील वाढचालीला शुभेच्छा देण्यात आले.
‌‌आदर्श विवाह सोहळ्याचा दहा हजारोच्या वर लोकांची‌ महिला पुरुषाची उपस्थिती होती. या आदर्श विवाह सम्मेलन यशस्वीतेसाठी कोरची तालुक्यातील कवर‌ समाजातील पदाधिकारी सदस्य व महिला, पुरुषांनी परिश्रम घेतले. आदर्श विवाह संमेलनांचे संचालन प्रा.गणेश सोनकलकी सर, प्रास्ताविक भिकम फुलकवर अध्यक्ष कवर समाज यांनी केले.

या प्रसंगी प्रामुख्याने मंचावर विवाह संमेलनाचे उद्घाटक म्हणुन खासदार तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, अध्यक्ष म्हणुन भारत दुधनांग संचालक.म.रा.आ.वि.मं
नाशिक, विशेष अतिथी अंबिका बंजार सभापती पंचायत समिती देवरी, मनोज अग्रवाल कोरची, रामसुराम काटेंगे गोंड‌समाज अध्यक्ष कोरची, प्रा. देवराव गजभिये, आनंद चौबे, गणेश सोनवानी नायब तहसीलदार, पितांबर आरगदुल्ला जिल्हा उपाध्यक्ष कंवर समाज छ.ग.महा.
कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अमोल फडतरे, गणेश फुलकवर ए. पी. आय., के. डी. चंद्रमा वडेगाव, सुनिता मडावी‌ सरपंच,, नरेश जमकातन, चेतन‌ जमकातन, पदमाकर मानकर, देशरबाई सोनकुकरा, रूखमन‌‌ घाटघुमर, डॉ. शैलेंद्र बिसेन नगरसेवक, अशोक फुलकवर, उमेश बागडेहरिया, जासल सांगसुरवार, लग्नुसन कार्यपाल, प्रा. मुरलीधर‌ रुखमोडे, भिकम फुलकवर क्षेत्र अध्यक्ष (आदिवासी कवर समाज) पत्रकार राष्ट्रपाल नखाते, राहुल‌ अंबादे, आसाराम फूलकवर, राधेश्याम फूलकवर, परमानंद पूजेरी, प्रकाश गंगाकाचूर तसेच हजारोंच्या संख्येने महिला पुरुषांची उपस्थिती होती.