वर्ग 3 व 4 ची पदभरती स्थानिक पातळीवरच केली जावी : मंत्री धर्मरावबाबा आत्राम

17

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील युवकांनी मोर्चा काढत वर्ग 3 व 4 ची भरती जिल्ह्यातच घेण्यात यावी, अशी मागणी घेऊन मोर्चा काढला होता. यावर आज मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

गडचिरोली जिल्ह्यात वर्ग 3 व 4 ची पदभरती जिल्ह्यामध्येच घेण्यात यावी जेणेकरून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. बाहेर जिल्ह्यातील कर्मचारी गडचिरोली जिल्ह्यात 1-2 वर्ष काम करून बदली करून घेतात. यामुळे जिल्ह्यात बहुतेक जागा रिक्त राहतात. जिल्ह्याचा युवक हा सेवानिवृत्त होईपर्यंत जिल्ह्यातच सेवा देईल यामुळे रिक्तपदाचा ताण येणार नाही.

वर्ग 3 व 4 यांची पदभरती हे जिल्ह्यातच झाली पाहिजे, असे माझे वयक्तिक मत आहे व ही मागणी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचविणार, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.