मौशिखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात गुंजला जय-भिम नामाचा गजर !

85

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद कात्रटवार यांनी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गिलगाव, अमिर्झा, टेंभा, कळमटोला, आंबेशिवणी, गिलगाव, आंबेटोला येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी जिल्हा परिषद क्षेत्रात सर्वच गावातील कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावागावात उत्साहाचे वातावरण पसरले होते. जय भिम नामाच्या जयघोषाने गाव परिसर दुमदुमून गेला.
मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने शासनाने सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांंवर निर्बंध लावले होते. यावर्षी कोरोनाचे निर्बंध काढण्यात आल्याने मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील समाज बांधवांनी सर्वत्र जल्लोषात बाबासाहेबांची जयंती साजरी करून त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले. गावात निळे ध्वज, निळ्या पताका व जय-भिमच्या जयघोषाने मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या गावातील वातावरण भिममय झाले होते.
कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रवाटर म्हणाले की, भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा व त्यांचे कार्य हे केेवळ आपल्या भारत देशापुरतेच नव्हे समस्त जगासाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांनी समाजातील दिन दुबळयाच्या सेवेसाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांच्या कार्यामुळे आज बहुजन समाजाला न्याय, हक्क मिळून सन्मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी व आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वप्रथम काटेरी मार्गाचा सामना करावा लागतो. तेव्हाच आपण यशस्वी होऊ शकतो शिक्षण हे यशस्वी जीवनाचा महत्वपुर्ण भाग आहे. त्यामुळे प्रत्येकांनी शिक्षण घेऊन विद्याभूषीत बनले पाहिजे. जीवनात सहजासहजी काहीच प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतोच. त्यामुळे परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श जोपासून समाजबांधवांनी वाटचाल करावी आणि समाजाचा विकास घडवून आणावा. देशात समता व बंधुत्वता निर्माण होण्यासाठी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला महत्वपुर्ण अशी राज्यघटना अर्पण केली. राज्यघटनेत सर्वांना न्याय, हक्क अधिकार बहाल करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी होऊन सर्वांना न्याय, हक्क, अधिकर प्राप्त झाला पाहिजे, असेही शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. याप्रसंगी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, रामटेके साहेब, सुनील मेश्राम, प्रमोद गावड़े, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे, राजू जवादे, अरुण बरापात्रे, संजय मेश्राम, नेकेश लोहबरे, दसरथ चापले यांच्यासह गावातील समाज बांधव व गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.