गडचिरोली जिल्हयात कोरडा दुष्काळ जाहिर करा : डाॅ. नामदेव उसेंडी

65

– सद्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेते सत्तेत मस्त तर जनता मात्र दुष्काळामुळे त्रस्त

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ५ जुलै २०२३ : जिल्हयामध्ये मागील एक महिण्यापासून आवश्यक तेवढा पाऊस न झाल्यामुळे शेतक-यांनी दरवर्षीप्रमाणे जुन महिण्यामध्ये पेरणी केली. परंतु पाऊस न आल्याने केलेली पेरणी वाया गेलेली आहे. तसेच बियाणे व खताचा सुध्दा फार मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी चिंतातुर असून याकडे कुढल्याही लोकप्रतिनिधीच लक्ष नाही. सद्या महाराष्ट्रात सिध्दांतहिन विचारहीन, स्वार्थी सत्तेसाठी हपापलेली राजकारणात नेते मंडळी मस्त आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनता मात्र कोरडा दुष्काळाने त्रस्त आहे. या बाबींचा विचार करुन लवकरात लवकर शेतक-यांना कोरडा दुष्काळ जाहिर करुन शेतक-यांना एकरी 15 हजार रुपये मदत करावी व तात्काळ बि-बियाणे, खते शेतक-यांना मोफत पुरवण्यात यावी, अन्यथा काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करुन मंत्र्यांना घेराव करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅग्रेसचे अध्यक्ष डाॅ. नामदेव उसेंडी यांनी महाराष्ट्रातील सरकारला दिलेला आहे.