वखार आपल्या दारी, वखार महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन

199

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शेतमाल साठवणुकीच्या विविधा योजनांचा लाभ थेट शेतकर्‍यांना व्हावा यासाठी महाराष्ट राज्य वखार महामंडळ, कृषी विभाग व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वखार आपल्या दारी, महामंडळाचे वचन शेतमाल संरक्षण अभियान’ अंतर्गत शेतमाल तारणा योजनेची शेतकर्‍यांना माहिती मिळावी याकरिता 25 नोव्हेंबर रोजी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गडचिरोली या वखार केंद्रावर करण्यात आले. कार्यशाळेत साठा अधीक्षक ए. शा. माडेमवार यांच्याद्वारे वखार महामंडळमधील शेतकर्‍यांच्या हिताचे, योजनांचे उलघडा करत शेतकर्‍यांना कुठल्या प्रकारे वखार महामंडळाद्वारे फायदा होऊ शकतो. जसे की, वखारीमधील मालाची साठवणूूक, वखार पावती, शास्त्र शुद्ध पद्धतीच्या साठवणुकीस असलेल्या मालाला फवारणी, साठवणुकीस असलेल्या मालावर तारण कशाप्रकारे प्राप्त करता येऊ शकतो. शेतकर्‍यांचा पिक पेरे पत्रकावर  50 टक्के वखार भाडे या सर्व बाबींचा समावेश कत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा कुषी अधीक्षक बसवराज मस्तोळी यांच्याद्वारे शेतमाल किमान आधारभूूत किंमत, शेतमालाचे मागणी व पुरवठा या विषयावर प्रकाश टाकत शेतमालाचे आवक, जावक वखार महामंडळ यांच्याद्वारे शेतमाल तारणा कर्जाकरिता कुठलेही जास्त कागदपत्र न घेता शेतमालावर तारण मिळवून देत असते. करिता शेतकरी बांधवांना शेतमाल वखारीमध्ये साठवणूूक करुन गरजेपोटी तारण योजनेचा फायदा घ्यावा व वाजवी दरापेक्षा जास्त दर शेतमालाला आल्यानंतच विकावे, असे आवाहन केले. तसेच वखारीमधील साठवणुुकीचे विश्‍लेषण करत शेतकर्‍यांना कशाप्रकारे शेतमाल साठवणूूक करुन त्याचे फायदे कशाप्रकारे घेता येऊ शकते याबाबत त्यांच्याद्वारे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांना मार्गदर्शन करण्यात आले. वखार महामंडळाने महाराष्ट्र सहकारी बँकेच्या सहकार्याने ब्लॉक चैनद्वारे अभिवन शेतमाल तारण योजनेद्वारे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी याकरिता तारणची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये कुठलेही जास्त हेलपाटे न मारता थेट शेतकर्‍यांना साठवणुुकीस असलेल्या मालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज 9 टक्के द. सा. द. से. दराने उपलब्ध करुन दिले जाते. तसेच शेतकर्‍यांना 5 लाखांपर्यंतचे व शेतकरी उत्पादक कंपनी यांना 75 लाखापर्यंत कर्ज 24 तासांमध्ये त्यांच्या खात्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे आरटीजीएस द्वारे वर्ग करण्यात येते. शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे येथील वरिष्ठ सल्लगार भाऊसाहेब तेमगर यांनी केले.
सदर कार्यशाळेस कृ. उ. बा. स. गडचिरोलीचे मुख्य प्रशासक प्रभाकर वासेकर, कृ. उ. बा. स. गडचिरोलीचे सचिव नरेंद राखडे, उपविभागीय कषी अधिकारी निलेश गेडाम, उपविभागीय कषी अधिकारी प्रदीप वहाने, झाडीपट्टी एफपीसी योगाजी बनपूरकर, पर्लकोटा एफपीसी श्रीमती मीना गरगम, एमएसव्हीसी गडचिरोलीचे चतुर्थश्रेणी कर्मचारी स. बा. बिसेन, वखार केंद्रावरील कंत्राटी कर्मचारी अंकुश उईके, वनपाल कुमरे, शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित वर्ग उपस्थित होते. कार्यक‘माचे आभारप्रदर्शन गडचिरोलीचे साठा अधीक्षक ए. शा. माडेमवार यांनी केले.